मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
Read More
Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .
Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .
Read More
महाराष्ट्रातील आजचे 17 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव पहा.
महाराष्ट्रातील आजचे 17 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव पहा.
Read More
सोयाबीन बाजारभाव ; राज्यातील आजचे 17 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव.
सोयाबीन बाजारभाव ; राज्यातील आजचे 17 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव.
Read More

Ramchandra sabale havaman ; पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज रामचंद्र साबळे.

Ramchandra sabale havaman ; पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज रामचंद्र साबळे

Ramchandra sabale havaman ; ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी राज्यात बुधवार, १५ ऑक्टोबर ते शनिवार, १८ ऑक्टोबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र आणि ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय झाल्यामुळे हवामानात बदल झाला असून, पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हा मान्सूनोत्तर पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन हवामानाचा अंदाज घेऊनच करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान बदलाची कारणे

डॉ. साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रावरील हवेचा दाब सुमारे १००६ हेक्टापास्कलपर्यंत कमी राहणार आहे. याच वेळी, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरातील पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पनिर्मिती होत आहे. याउलट, प्रशांत महासागरात ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय असून, पेरूजवळ समुद्राचे पाणी १४ अंश सेल्सिअसपर्यंत थंड झाले आहे. या हवामान बदलांमुळे बाष्पयुक्त वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत, ज्यामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

विभागनिहाय पावसाचा अंदाज

येत्या चार दिवसांत कोकण विभागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर नसेल. ज्या ठिकाणी हवेचा दाब कमी होईल, त्याच ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला

बदललेल्या या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीकामांचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

Leave a Comment