पती – वडीत नाही मंग कशी करावी kyc संपूर्ण प्रोसेस येथे पहा.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC प्रक्रियेत सहभागी होताना विधवा, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांना पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड अथवा ओटीपी क्रमांक उपलब्ध होत नाही, अशा महिलांना मोठ्या अडचणी येत आहेत.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
शासनाने या गंभीर समस्येची दखल घेतली आहे. लवकरच या विशिष्ट प्रकरणांसाठी ओटीपी बायपास करण्यासाठी आणि इतर आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी तोडगा काढला जाईल, अशी माहिती मिळत आहे. हा अंतिम तोडगा येईपर्यंत, अशा महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही काळ थांबणे योग्य राहील.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
या संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा अडचणींसाठी महिला आपल्या अंगणवाडी सेविका किंवा तालुका स्तरावरील महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.
राज्य शासनाने योजनेत पूर्णपणे पारदर्शकता आणण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत महिला लाभार्थ्याचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, तसेच कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक आहे का, यांसारखी आवश्यक माहिती पडताळून पाहिली जात आहे.
e-KYC मुदतवाढ
सुरुवातीला ही प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे निर्देश होते. मात्र, राज्यात गेल्या काही महिन्यांत आलेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती तसेच योजनेच्या पोर्टलवर आलेल्या ओटीपी त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे महिलांना KYC करता आली नाही. याच कारणामुळे, अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांसाठी e-KYC करण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे. ही मुदत साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा त्यानंतरही वाढवली जाण्याची शक्यता आहे.
e-KYC बाबतचे गैरसमज
लाभार्थ्यांमध्ये e-KYC बद्दल असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे. e-KYC चा अर्थ ‘केवायसी केली तरच पैसे मिळतील’ किंवा ‘केवायसी नाही केली तर अपात्र होणार’, असा नाही. e-KYC मुळे योजनेत केवळ पारदर्शकता आणली जात आहे. योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला e-KYC केल्यानंतरही अपात्रच राहतील.
अपात्र अर्ज आणि थकीत हप्ते
सरकारने यापूर्वी अनेक महिलांच्या अर्जांची पडताळणी केली होती, त्यापैकी बहुतांश अर्ज पात्र ठरले आहेत. उर्वरित अर्जांची तपासणी सुरू असून, त्यात अपात्र आढळल्यास त्यांना बाहेर काढले जाईल. याशिवाय, ज्या पात्र महिलांची पडताळणी पूर्ण झाली आहे आणि ज्यांचे हप्ते काही कारणांमुळे बंद झाले होते, त्यांना आता त्यांचे थकीत असलेले हप्ते सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहेत.