मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
Read More
Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .
Pm kisan big update ; पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी अपात्र होणार .
Read More
महाराष्ट्रातील आजचे 17 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव पहा.
महाराष्ट्रातील आजचे 17 ऑक्टोबरचे कांदा बाजारभाव पहा.
Read More
सोयाबीन बाजारभाव ; राज्यातील आजचे 17 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव.
सोयाबीन बाजारभाव ; राज्यातील आजचे 17 ऑक्टोबरचे सोयाबीन बाजारभाव.
Read More

अतिवृष्टी मदत नवीन तालुके यादी पहा, तुमचा तालुका आहे का?

अतिवृष्टी मदत नवीन तालुके यादी पहा, तुमचा तालुका आहे का?

महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयात (GR) महत्त्वपूर्ण बदल करून एक नवीन, सुधारित जीआर प्रसिद्ध केला आहे. या नव्या निर्णयामुळे मदतीची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.

या सुधारित शासन निर्णयानुसार, मदतीसाठी पात्र तालुक्यांची संख्या २५३ वरून २८२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामध्ये २९ नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. शासनाने या तालुक्यांचे ‘पूर्ण बाधित’ (एकूण २५१) आणि ‘अंशता बाधित’ (एकूण ३१) असे वर्गीकरण केले आहे. हे स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘अंशता बाधित’ म्हणून घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये केवळ प्रत्यक्ष नुकसान झालेल्या महसूल मंडळांनाच या सवलतींचा लाभ मिळेल.

शासनाकडून मिळणाऱ्या प्रमुख सवलती खालीलप्रमाणे आहेत:
1) बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या महसुलात सूट.
2) सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची सुविधा
3) शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती.
4) शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या तीन महिन्यांच्या वीज बिलात माफी.
5) पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.

यासोबतच, रब्बी हंगामातील पेरणीसाठी कृषी निविष्ठा (बियाणे, खते) खरेदी करता यावी, यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान थेट वितरित केले जाणार आहे.

Leave a Comment