अखेर राशनचे पैसे खात्यात जमा,१४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?
अखेर राशनचे पैसे खात्यात जमा,१४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा..पहा तुमचे आले का?
Read More
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मोठा बदल..हि अट रद्द.
Read More
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
मछिंद्र बांगर हवामान अंदाज ; महाराष्ट्रात वादळी प्रणालीमुळे जोरदार पावसाचा धुमाकूळ.
Read More
Ladki bahin kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा.
Ladki bahin kyc ; लाडकी बहीण योजना kyc अशी करा.
Read More

Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.

Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.

Pm kisan 21 installment ; पीएम किसानचा 21 वा हप्ता कधी येणार.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेच्या २१ व्या हप्त्याकडे देशातील कोट्यवधी शेतकरी डोळे लावून बसले आहेत. नुकतेच केंद्र सरकारने काही पूरग्रस्त राज्यांना आगाऊ मदत देऊन दिलासा दिला आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा बहुप्रतिक्षित हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पूरग्रस्त राज्यांना तातडीचा दिलासा.

मागील काही दिवसांपूर्वी देशातील पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला होता. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत २६ सप्टेंबर २०२५ रोजी या तीन राज्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान योजनेचा २१ वा हप्ता आगाऊ स्वरूपात जमा केला. या अंतर्गत, सुमारे २७ लाख ६८ शेतकऱ्यांना ५४० कोटी रुपयांची मदत थेट वितरित करण्यात आली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आधार देण्याच्या सरकारच्या या निर्णयाचे स्वागत झाले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नजरा केंद्राकडे.

एकीकडे पूरग्रस्त राज्यांना तातडीची मदत मिळाली असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकरीही अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही भागांत परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. खरीप हंगाम जवळजवळ हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील शेतकरीही मदतीच्या मोठ्या अपेक्षेत आहेत. राज्य सरकारकडून केंद्राकडे NDRF च्या मदतीची मागणी सातत्याने केली जात आहे. अशा परिस्थितीत PM किसान योजनेचा हप्ता लवकरात लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment