बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
बंगालच्या उपसागरात पुन्हा एक प्रणाली विकसित महाराष्ट्रात काय परिणाम मच्छींद्र बांगर हवामान अभ्यास
Read More
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
अतिवृष्टी अनुदान योजना: हेक्टरी ₹10,000..तालूके यादी पहा.
Read More
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार ; पंजाब डख यांचा सविस्तर हवामान अंदाज.
Read More
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
गहू पिकाचे योग्य खत व्यवस्थापन ; पेरणी करताना हेच खत टाका गहू पिकाचे योग्य खत.
Read More

Maharashtra rain news ; मोंथा चक्रीवादळाचा परिणाम आणखी किती दिवस राहणार.

Maharashtra rain news ; मोंथा चक्रीवादळाचा परिणाम आणखी किती दिवस राहणार.

Maharashtra rain news ; बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. बुधवारी दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने भातशेतीला मोठा फटका बसला आहे.

किनारपट्टीवर वादळी वारे सुटल्याने जिल्ह्यातील सर्वच मासेमारी नौका बंदरांमध्ये थांबल्या आहेत आणि मासेमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समुद्रात वादळसदृश स्थिती उद्भवेल, असा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता. त्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सातत्याने हवामानात बदल घडत आहेत.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात कोकण किनारपट्टीवर दिसून येत आहे. मागील आठवडाभर कोकण किनारपट्टीवर वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. काल (ता. २८) एक दिवसाचा अपवाद वगळता पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा निश्वास सोडला होता. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भात सुकवून गोळा केले आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवले होते. आज सकाळी कापणीला पुन्हा सुरुवात झाली, मात्र दुपारनंतर अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरण तयार झाले.

Leave a Comment