IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
Read More
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
Read More
तूर बाजारभाव राज्यातील आजचे 30 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा
तूर बाजारभाव राज्यातील आजचे 30 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा
Read More
Cotton rate Maharashtra ; आजचे 30 ऑक्टोबर चे कापूस बाजारभाव.
Cotton rate Maharashtra ; आजचे 30 ऑक्टोबर चे कापूस बाजारभाव.
Read More

शेतकऱ्यांनो सतर्क रहा, या तारखांना जोरदार पाऊस येत आहे मछिंद्र बांगर हवामान अंदाज.

शेतकऱ्यांनो सतर्क रहा, या तारखांना जोरदार पाऊस येत आहे मछिंद्र बांगर हवामान अंदाज.

डॉ मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार, सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ‘डिप्रेशन’ (कमी दाब क्षेत्र) तयार झाले आहे. दोन्ही समुद्रातील या वादळी प्रणालींमुळे महाराष्ट्रासह देशाच्या हवामानावर परिणाम होत आहे. दोन्ही डिप्रेशनची गती वाढल्यास त्यांचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात लवकरच ‘मोन्था’ चक्रीवादळ तयार होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील डिप्रेशन मात्र अंतर्गत भागात जास्त काळ डिप्रेशनच्या रूपात राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रातील प्रणाली अंतर्गत भागात सरकल्यामुळे महाराष्ट्रावर येणाऱ्या अतिवृष्टीचा किंवा मुसळधार पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यात आता फार जोरदार पाऊस नाही, परंतु नाशिक, धुळे आणि नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह किरकोळ पावसाळी वातावरण तयार होत आहे. या प्रणालीचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम कमी झाला असला तरी, बंगालच्या उपसागरातील ‘मोन्था’ चक्रीवादळामुळे पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होईल.

मोन्था चक्रीवादळाचा मोठा घेर तयार होऊन वादळी वाऱ्यांचा प्रभाव वाढेल. स्कायमेटच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील ही प्रणाली ओरिसावरून भारताच्या भूभागावर प्रवेश करेल. याचा तीव्र फटका ओरिसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांना बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर याचा थेट परिणाम कमी असला तरी, विदर्भाच्या पूर्व भागातून ही प्रणाली सरकण्याची शक्यता असल्याने २९ ऑक्टोबरदरम्यान गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. यामुळे नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांवरही तीव्र परिणाम जाणवू शकतो.

Leave a Comment