माणिकराव खुळे अंदाज ; राज्यात पाच दिवस वादळी पावसाची शक्यता: दोन कमी दाब क्षेत्रांचा परिणाम
माणिकराव खुळे अंदाज ; राज्यात पाच दिवस वादळी पावसाची शक्यता: दोन कमी दाब क्षेत्रांचा परिणाम
Read More
गव्हाचे टॉप ५ वाण ; उत्कृष्ट उत्पादन आणि खाण्यासाठी सर्वोत्तम.
गव्हाचे टॉप ५ वाण ; उत्कृष्ट उत्पादन आणि खाण्यासाठी सर्वोत्तम.
Read More
पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.
पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.
Read More
बंगाल की खाड़ी में बन रहा चक्रवात, ओडिशा सरकार ने जारी किया हाई अलर्ट.
बंगाल की खाड़ी में बन रहा चक्रवात, ओडिशा सरकार ने जारी किया हाई अलर्ट.
Read More

हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले.

हेक्टरी 18500 नुकसान भरपाई, हाती मात्र 1500 ते 5,6 किंवा 7 हजार मिळाले.

मागील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये प्रति हेक्टर ६,८०० रुपयांऐवजी ८,५०० रुपये मदत जाहीर करण्यात आली आणि त्याची मर्यादा दोन हेक्टरवरून वाढवून तीन हेक्टर करण्यात आली.

याव्यतिरिक्त, रबी हंगामासाठी वाढीव १०,००० रुपयांचे अनुदान आणि पीक विम्याच्या माध्यमातून प्रति हेक्टर १७,००० रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आले. दिवाळीपूर्वीच ही नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मात्र, शासनाच्या या मोठ्या घोषणा प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती येताना ‘हवेत विरल्यासारख्या’ झाल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या अपेक्षा होत्या की त्यांना किमान दोन किंवा तीन हेक्टरच्या मर्यादेत मोठी मदत मिळेल, परंतु प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात अगदी किरकोळ रकमा जमा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी ५० आरसाठी १,५०० रुपये, ६० आरसाठी १,८०० रुपये किंवा २,२०० ते ४,००० रुपयांपर्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली आहे.

Leave a Comment