IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
IMD rain big Update आवकाली पावसाचा मुक्काम काढला पहा हवामान अंदाज.
Read More
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
शेतकऱ्यांसाठी दिलासा ; तीन जिल्ह्यांची थकीत नुकसान भरपाई अखेर मंजूर! शेतकऱ्यांसाठी दिलासा
Read More
तूर बाजारभाव राज्यातील आजचे 30 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा
तूर बाजारभाव राज्यातील आजचे 30 ऑक्टोबर चे तूर बाजारभाव पहा
Read More
Cotton rate Maharashtra ; आजचे 30 ऑक्टोबर चे कापूस बाजारभाव.
Cotton rate Maharashtra ; आजचे 30 ऑक्टोबर चे कापूस बाजारभाव.
Read More

आंदोलनाची वाटचाल कर्जमाफी कडे”: नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचा वाढता दबाव.

आंदोलनाची वाटचाल कर्जमाफी कडे”: नागपूर येथील शेतकरी आंदोलनाचा वाढता दबाव.

१.बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचा ज्वलंत संघर्ष.

नागपूरमध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. कर्जमाफी आणि इतर २२ मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटनांचे नेते, राजकीय पक्षाचे नेते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाधित शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. स्वतःची पोळी भाजणाऱ्या काही लोकांमुळे गालबोट लागत असले तरी, खऱ्या तळमळीने आलेला शेतकरी मोठ्या संख्येने यात सहभागी झाला आहे. यामुळे या आंदोलनाची वाटचाल खऱ्या अर्थाने आता कुठेतरी कर्जमाफीकडे चाललेली आहे.

२.आश्वासनांची पूर्तता आणि सरकारची सकारात्मकता.

मागील अन्नत्याग आंदोलनात सरकारने कर्जमाफीसाठी अभ्यासगट समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. समिती घटित झाली, अभ्यासही झाला, परंतु दिव्यांगांचे मासिक मानधन वाढवण्याव्यतिरिक्त कर्जमाफीचा मूळ विषय तसाच राहिला. आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणारच आहोत, म्हणजे सरकार सकारात्मक आहे. मग कर्जमाफी करायचीच असेल, तर ती का केली जात नाही? हा शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळेच हे आंदोलन अर्थी शेतकऱ्यांसाठी एक ‘सूर्योदय’ ठरत आहे.

३.आंदोलनाच्या दबावामुळे तात्काळ मिळालेले सकारात्मक परिणाम

शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रतिसाद पाहिल्यानंतर आंदोलनाचा तत्काळ परिणाम दिसून आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील थकीत असलेला प्रस्ताव सरकारने ताबडतोब मंजूर करून ९१३ कोटी रुपयांचा निधी वितरित करायला मंजुरी दिली. याशिवाय, आंदोलनात मागणी नसतानाही सरकारने तातडीने हालचाल करत १०,००० रुपयांचे रबी अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट क्रेडिट करण्यासाठी ‘जीआर’ (शासन निर्णय) निर्गमित केला आहे. आंदोलनाची गर्दी आणि व्यापक स्वरूप पाहिल्यानंतर सरकारने कुठेतरी आता हालचाली ताबडतोब सुरू केलेल्या आहेत.

Leave a Comment